आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रवैभवशाली महाराष्ट्र न्युज

मागील ४२ वर्षांपासून हजारो अभियंत्यांच्या करिअरला दिशा देणारे टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्निक

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये नामांकीत कंपन्यांच्या कॅम्पस मुलाखतीतून अंतिम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांना मिळाली नौकरी

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

येथील महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था संचलीत, टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्निक मध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ येथे विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विविध नामांकीत एम.एन.सी.कंपन्यांच्या कॅम्पस मुलाखतीतून विद्यार्थ्यांना ते शिकत असतानाच नौकरी मिळाली हे विशेष होय.

 

एप्रिल-२०२५ महिन्यांत विविध नामांकित कंपन्यांनी भेटी देऊन पॉलिटेक्निक मध्ये कॅम्पस मुलाखतींचे आयोजन केले होते. यामध्ये सर्वच्या सर्व (१४८) १०० टक्के विद्यार्थ्यांची निवड होऊन, पात्र विद्यार्थ्यांना आकर्षक पगारावर काम करण्याची संधी मिळाली. तसेच द्वितीय वर्षांतील ११३ विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी आकर्षक मानधनावर नामांकीत कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळवून देण्यात आली. टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्निक हे मागील ४२ वर्षांपासून तंत्रशिक्षणात विद्यार्थ्यांना घडवत आलेले, ग्रामिण भागातील एक नांवाजलेले एकमेव पॉलिटेक्निक आहे. म्हणून या पॉलिटेक्निक मध्ये पुर्वीपासूनच प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा ओढा आणि पालकांची पसंती आहे. मागील शैक्षणिक वर्षापासून या पॉलिटेक्निक मध्ये, दोन नविन अभ्यासक्रमास तंत्रशिक्षण परीषदेने मंजूरी दिली आहे. त्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरींग व ईलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्यूटर इंजिनिअरींग हे होय. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आता एकूण पाच अभ्यासक्रम उपलब्ध झालेले आहेत. कॉम्प्यूटर इंजिनिअरींग, ईलेक्ट्रीकल इंजिनिअरींग, मेकॅनिकल इंजिनिअरींग व दोन नविन अभ्यासक्रमामुळे ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या अभ्यासक्रमात डिप्लोमा इंजिनिअरींग होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. तंत्रशिक्षण मंडळाच्या परीक्षेत या पॉलिटेक्निकचा निकाल सतत उंचावत आलेला आहे. उन्हाळी परीक्षेत विद्यार्थीनींनी निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी म.रा.तं.शिक्षण मंडळाच्या गुणवत्ताधारक शिष्यवृत्ती करीता, १३ विद्यार्थी पात्र ठरले. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावर भर दिला जातो. देश, विदेशात या पॉलिटेक्निकचे विद्यार्थी विविध पदांवर काम करीत आहेत. त्या माजी विद्यार्थ्यांकडून त्यांच्या कामाचा अनुभव व मार्गदर्शन सध्या शिक्षण घेत असलेल्या पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना होत आहे. हेच विद्यार्थी देशाचे व महाविद्यालयाचे नांव उज्ज्वल करीत आहेत. टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्निक येथे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये क्रिडा स्पर्धा, शिवजयंती उत्सव-२०२५, वृक्षारोपण, मुलींसाठी आत्मभान शिबीर, प्रकल्प स्पर्धा, अर्थ साक्षरतेचे महत्व अशा विविध उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. जानेवारी-२०२५ महिन्यांत छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या आय.ई.डी.एस.एस.ए.अंतर्गत क्रिडा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बॅडमिंटन, व्हॉलिबॉल, क्रिकेट, बुद्धीबळ या स्पर्धांमध्ये भाग घेऊन बॅडमिंटन स्पर्धेत द्वितीय पारीतोषिक मिळविले. फेब्रुवारी-२०२५ महिन्यांत लातूर येथे झालेल्या प्रकल्प स्पर्धेत प्रकल्प सादर करून सहभाग नोंदविला. तसेच शिवजयंतीनिमित्त रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, गड किल्ले बनविणे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महिलांच्या आरोग्याची काळजी यावर मार्गदर्शन करण्यासाठी डॉ.अरूणा केन्द्रे, डॉ.अर्चना थोरात, डॉ.नवनाथ घुगे या तज्ज्ञ डॉक्टरांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. मार्च-२०२५ महिन्यांत महिला दिनानिमित्त सावित्रिमाई फुले यांच्या शिक्षण विषयक कार्यावर मुलींनी भाषणातून आपले विचार व्यक्त केले. तसेच मुलींसाठी आयोजित केलेल्या शिवकालीन युद्ध व मर्दानी खेळांचे प्रशिक्षण यामध्ये, लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट‌्टा यांचे प्रशिक्षण देण्यात आले. सोबतच ‘व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर बि.के.कबीर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पॉलिटेक्निकच्या संगणक अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांनी टेककिर्तीचे आयोजन केले होते. महाविद्यालयाच्या व विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ बसवंतराव सांगवे, उपाध्यक्ष माधवराव त्रिंबकराव पाटील चिंचोलीकर, सचिव माधवराव हणमंतराव पाटील टाकळीकर, सहसचिव सुनिल सिद्रामप्पा मिटकरी, सर्व सन्माननीय संचालक, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य व मार्गदर्शक डॉ.बी.आय.खडकभावी यांनी अभिनंदन केले. पॉलिटेक्निकचे प्राचार्य एल.व्हि.बगले व सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक आणि कर्मचारीवृंद यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबत त्यांच्या सर्वांगिण विकासावर सुधारणा घडवून आणत आहेत. विविध नामांकीत कंपन्यांच्या कॅम्पस मुलाखतीतून विद्यार्थ्यांना ते शिकत असतानाच नौकरी देणारे टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्निक हे ग्रामीण भागातील तरूणांसाठी नेहमीच आशेचा किरण बनले आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.