आपला जिल्हाराजकीय

न्याय व्यवस्थाच आता लोकशाहीला बळकट करेल – आ.धीरज देशमुख

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान बीड जिल्ह्यात आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन

वैभवशाली महाराष्ट्र न्युज नेटवर्क

———————————-
अंबाजोगाई (वार्ताहर)
भारतीय राष्ट्रीय काँंग्रेस पक्षाच्या वतीने 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशातील प्रत्येक जिल्ह्यात 75 कि.मी.अंतरावर आझादी गौरव पदयात्रा काढण्याचे निर्देश अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने दिलेले आहेत. त्यानूसार बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे असे सांगून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि बांधणीत ज्यांनी योगदान दिले. त्या सर्वांचा गौरव या यात्रेच्या निमित्ताने करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अनेक गावातून ही यात्रा निघून या यात्रेत काँग्रेस पक्षाच्या नेते, पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक सहभागी होणार आहेत. अशी माहिती काँग्रेसचे आ.धिरज विलासरावजी देशमुख यांनी अंबाजोगाईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.अंबाजोगाईतील अंबारी शासकीय विश्रामगृहात शनिवार, दि. 6 ऑगस्ट रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आ.धिरज देशमुख, बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनवणे, सरचिटणीस लक्ष्मणराव पौळ, नवनाथराव थोटे, पशुपतीनाथ दांगट, प्रविणकुमार शेप, नारायणराव होके, दत्ता कांबळे, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष ईश्‍वर शिंदे, शहराध्यक्ष आसेफोद्दीन खतीब, सरपंच संजयकाका देशमुख, बीडचे तालुकाध्यक्ष गणेश दादा बजगुडे, प्रविण देशमुख, अशोक देशमुख, गणेश गंगणे, संजय काळे, धनराज कोळगिरे, बप्पासाहेब देशमुख, शेख अकबर, दयानंद कांबळे, भगत, बाळासाहेब जगताप, किरण उबाळे आदींसह बीड जिल्ह्यातून काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना आ.धिरज देशमुख यांनी सांगितले की, काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या श्रीमती सोनियाजी गांधी, खा.राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी, महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, खा.सौ.रजनीताई पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार बीड जिल्ह्यात 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान अनेक तालुक्यात 75 कि.मी.आझादी गौरव पदयात्रा काढण्यात येणार आहेत. बीड जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी आझादी गौरव पदयात्रेचे चांगले नियोजन करण्यात आले आहे. या यात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. ही यात्रा मंगळवार, दि. 9 ऑगस्ट रोजी शिरूर कासार या तालुक्यातून सुरू होईल. तालुकाध्यक्ष रमेश सानप हे या यात्रेचे संयोजन करतील, बुधवार, दि. 10 ऑगस्ट रोजी ही यात्रा गेवराई तालुक्यातून निघेल तालुकाध्यक्ष महेश बेद्रे हे या यात्रेचे संयोजन करतील. गुरूवार दि. 11 ऑगस्ट रोजी माजलगाव येथून ही यात्रा निघेल तालुकाध्यक्ष महाविर काका मस्के हे या यात्रेचे संयोजन करतील, शुक्रवार, दि. 12 ऑगस्ट रोजी ही यात्रा सकाळी परळी येथून निघेल, तालुकाध्यक्ष प्रा.अनिल जाधव व शहराध्यक्ष सय्यद हनिफ सय्यद करीम (बहाद्दूरभाई) हे या यात्रेचे संयोजन करतील, याच दिवशी दुपारी ही यात्रा अंबाजोगाई तालुक्यातून ही निघेल तालुकाध्यक्ष ईश्‍वर शिंदे हे या यात्रेचे संयोजन करतील, रविवार, दि. 14 ऑगस्ट रोजी ही यात्रा केज तालुक्यातून निघेल तालुकाध्यक्ष अमर पाटील हे या यात्रेचे संयोजन करतील यात्रेची सांगता 15 ऑगस्ट रोजी बीड येथे होईल. याचे संयोजन तालुकाध्यक्ष गणेश दादा बजगुडे हे करतील. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेस पक्षाचे आणि भारतीय जनतेचे मोठे योगदान आहे. त्यांच्या या योगदानाचा गौरव या यात्रेच्या निमित्ताने करण्यात येणार आहे. या प्रसंगी आ.देशमुख यांनी सध्याची राजकिय परिस्थिती, ईडी, सीबीआय, आयकर या सारख्या सरकारी यंत्रणांचा राजकिय वापर या विषयी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांना नेमक्या शब्दांत उत्तरे दिली. देशातील सर्वसामान्य माणूस आजही काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी जोडला असल्याचे सांगुण न्याय व्यवस्थाच आता भारतीय लोकशाहीला बळकट करेल असा विश्‍वास आ.देशमुख यांनी या प्रसंगी व्यक्त केला. प्रारंभी जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी आझादी गौरव पदयात्रा आढावा बैठक आणि आझादी गौरव झेंडा महोत्सवाची तयारी या बाबतची माहिती दिली. पत्रकार परिषदेच्या आयोजनाबाबत तपशीलवार सांगितले. काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या श्रीमती सोनियाजी गांधी, खा.राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी, महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, खा.सौ.रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार बीड जिल्ह्यात 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान अनेक तालुक्यात 75 कि.मी.आझादी गौरव पदयात्रा काढण्यात येणार आहेत. बीड जिल्ह्यात खासदार सौ.रजनीताई पाटील, आ.धिरज विलासरावजी देशमुख आणि माजी मंञी अशोकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझादी गौरव पदयात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. या यात्रेत जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केले. तर पत्रकार परिषदेच्या शेवटी उपस्थितांचे आभार बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनवणे यांनी मानले. या पत्रकार परिषदेस बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे विविध विभाग, सेलचे पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

———————————

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.